Skip to main content

जागतिक ग्रंथ दिन








नमस्कार प्रिय वाचकांनो





मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव च्या ग्रंथालय विभागामार्फत आज जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. 
आपल्या संस्क्रुतीत ग्रंथांची प्रदीर्घ परंपरा आहे.  आधुनिकिकरणामुळे पुस्तके इंटरनेट आणि मोबाईल वर सहज उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञान मुळे वाचन प्रेम कमी झाले नाही तर फक्त माध्यम बदलले आहेत. वाचनसंस्कृती ही प्रगल्भ होत असून वाचना सोबत आता वाचक स्वतः ला व्यक्त करू लागली आहेत. सोशल मीडियाचां वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्याचाच विचार करून ब्लॉग या माध्यमाचा वापर करून आपल्याशी संवाद साधणार आहे.
जागतिक ग्रंथ दिंन _ २३ एप्रिल 

विल्यम शेकसपिअरच्या वाडमयाने जगभर गेली चार शतकांपेक्षा जास्त वर्षे गारूड केलेले आहे. २३ एप्रिल १५६४ रोजी जन्मलेले v २३ एप्रिल १६१६ रोजी मृत्युदिन शेक्सपिअरचा आहे. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला , वाचला गेलेला, चर्चा झालेला आपल्या साहित्यावर लिहिले गेलेल्या, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय लेखक आहे. तसेच त्यांच्या लेखनावर आधारित सर्वात जास्त साहित्यनिर्मिती विविध भाषांमधून झालेली आहे. त्यांचा जन्मदिन व स्मृतिदन २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. साहित्याच्या प्रांतातले जागतिक सम्राटपद वर्षानुवर्षे त्यांचे नाव अढळपणे सर्वमान्य झालेले आहे.  
युनेस्कोने ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्व हक्का विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन व स्वामित्व हक्क दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

        *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. जीवनाला समृद्ध करणारे सर्वच ज्ञान मग ते धर्म.. कला.. विज्ञान.. तंत्रज्ञान कोणतेही असो ग्रंथात दडलेय. ग्रंथ हा विवेक शिकवतो. जगाकडे बघण्याची दृष्टी देतो. मानवीय प्रगतीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.*
        *लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचन हा मंत्र दिलाय. आमच्या वेद.. उपनिषदे.. पुराणे.. गीता तसेच संत साहित्याने हे मनुष्य जीवन समृद्ध केलेय. या भूमितील व्यासमुनी असो वा वाल्मिकी जगविख्यात लेखक ठरलेत.*
        *हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली.* 
        *गावातील ग्रंथालय हे गावाचे सांस्कृतिक वैभव आहे. वाचक म्हणजे देशातील सुज्ञ नागरिक अशी ओळख आहे. ग्रंथ वाचनामुळेच देशाला दिशा देणारे महापुरुष घडलेत. पुस्तक म्हणजे जीवनास धडा देणारा इतिहास.. जीवन सुखद करणारे वर्तमान आणि जीवन उन्नत करणारा भविष्यकाळ.*
        *नविन पुस्तक  उत्सुकतेने बघणे. त्याचा गंध अनुभवणे.. चाळणे.. वाचणे हा अवर्णनीय आनंद आहे. पुस्तक प्रेम करायला शिकवते. पुस्तक हे केवळ पुस्तकच नसते. पुस्तक आशा.. आकांक्षानी जीवन सदैव प्रवाही ठेवते. त्यात रमून स्वर्गीय सुखाची अनुभुती प्राप्त करता येते. पुस्तक ही प्रत्येकाची मर्मबंध ठेव असते.*
     

*_पुस्तकातील खूण कराया_*
*_दिले एकदा पीस पांढरे;_*
*_पिसाहुनि सुकुमार काहिसे_*
*_देता घेता त्यात थरारे._*

*_मेजावरचे वजन छानसे_*
*_म्हणून दिला नाजूक शिंपला;_*
*_देता घेता उमटे काही_*
*_मिना तयाचा त्यावर जडला_*

*_असेच काही द्यावे घ्यावे_*
*_दिला एकदा ताजा मरवा_*
*_देता घेता त्यात मिसळला_*
*_गंध मनातिल त्याहून हिरवा._*

*गीत : इंदिरा संत*       ✍
*संगीत : गिरीश जोशी*
*स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर

       *!! घरी रहा !! सुरक्षित रहा !!*

Comments

  1. Ujjwala, mam, congratulations to you very much. Very nice activities. What you have written to justify today is very nice. Happy "Granth Din".

    ReplyDelete
  2. खुप छान पुस्तक दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  3. करसाळे मॅडम, अतिशय सुंदर उपक्रम आहे. ब्लागही छान आहे.विशेषतः इंदिरा संतांची कविता वाचताना मनाला मोरपंखीस काही स्पर्शून गेलं.
    खूप खूप छान मॅडम,
    धन्यवाद!

    ReplyDelete
  4. अभिनव उपक्रम..ग्रंथपालांना ब्लॉग काढून आशा पद्धतीने वाचनासाठी मंच उभा केलेला हे मी पहिल्यांदाच पाहिलं..खरच अभिनंदनीय आहे..

    ReplyDelete
  5. Madam this facility provides us excellent platform to be introduced with biographies. Thanks a lot for it, and wishes to it.

    ReplyDelete
  6. Tumacha ha upkram khup chan ahe madam. Tyamule vachnachi godi lagate

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...