Skip to main content

आमचा बाप आन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांनी ज्या पुस्तकाबददल अशी प्रतिक्रिया दिली - " साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप!" ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र.
या पुस्तकाच्या प्रकाशन दिवशीच १००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली.  २३ जानेवारी १९९३ रोजी ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १९९  मराठीआवृत्या निघालेल्या आहेत आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून नोंद झालेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच अशा एकूण २० देशी विदेशी  भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक. वीस वर्षांत सहा लाख प्रती विकल्या जाणारे हे पुस्तक  आजही बेस्ट सेलर म्हणून आहे. मराठी पुस्तकात प्रसन्न शैली व आशावादी जीवनदृष्टी दिसते. साहित्य अकादमी पुरस्कार ( पंजाबी भाषा) मिळालेला आहे.
 डॉ. नरेंद्र यांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस्सी करून १९८३ मध्ये अमेरिकेतील विद्याीठामार्फत डॉक्टरेट पदवी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान मिळवला. जाधव यांनी लिहलेले आत्मचरित्र आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची संघर्षाची कहाणी आहे. ही कहाणी डॉ. जाधवांनी सच्या दिलाने मांडली आहे. कोणतेही काम करतांना त्याच्यातला टॉपला जाण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली.  डॉ. नरेंद्र जाधव भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागरही , इंग्रजी, मराठी हिंदी विषयात लेखन, नामवंत शिक्षण तज्ञ , समाजशास्त्रज्ञ , ललित लेखक, नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष असे अनेक पदांवर नियुक्ती झाली आहे. कहाणी चार पिढीची संघर्षाची आहे. महत्त्वाकांक्षा आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास आर्थिक परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे आपले ध्येय गाठू शकतो हे त्यांनी व त्यांच्या भावंडांनी उच्चशिक्षण घेवून करून दाखविले.ही सगळी भावंडे कशी घडलीत याची संपूर्ण माहिती ह्यात आहे. 

Comments

  1. क्षेत्र कोणतेही कष्टाला पर्याय नाही. कोणतंही क्षेत्र निवडा पण सर्वोच्च ठिकाणी पोहचा... असा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...