Skip to main content

आमचा बाप आन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांनी ज्या पुस्तकाबददल अशी प्रतिक्रिया दिली - " साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप!" ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र.
या पुस्तकाच्या प्रकाशन दिवशीच १००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली.  २३ जानेवारी १९९३ रोजी ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १९९  मराठीआवृत्या निघालेल्या आहेत आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून नोंद झालेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच अशा एकूण २० देशी विदेशी  भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक. वीस वर्षांत सहा लाख प्रती विकल्या जाणारे हे पुस्तक  आजही बेस्ट सेलर म्हणून आहे. मराठी पुस्तकात प्रसन्न शैली व आशावादी जीवनदृष्टी दिसते. साहित्य अकादमी पुरस्कार ( पंजाबी भाषा) मिळालेला आहे.
 डॉ. नरेंद्र यांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस्सी करून १९८३ मध्ये अमेरिकेतील विद्याीठामार्फत डॉक्टरेट पदवी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान मिळवला. जाधव यांनी लिहलेले आत्मचरित्र आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची संघर्षाची कहाणी आहे. ही कहाणी डॉ. जाधवांनी सच्या दिलाने मांडली आहे. कोणतेही काम करतांना त्याच्यातला टॉपला जाण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली.  डॉ. नरेंद्र जाधव भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागरही , इंग्रजी, मराठी हिंदी विषयात लेखन, नामवंत शिक्षण तज्ञ , समाजशास्त्रज्ञ , ललित लेखक, नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष असे अनेक पदांवर नियुक्ती झाली आहे. कहाणी चार पिढीची संघर्षाची आहे. महत्त्वाकांक्षा आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास आर्थिक परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे आपले ध्येय गाठू शकतो हे त्यांनी व त्यांच्या भावंडांनी उच्चशिक्षण घेवून करून दाखविले.ही सगळी भावंडे कशी घडलीत याची संपूर्ण माहिती ह्यात आहे. 

Comments

  1. क्षेत्र कोणतेही कष्टाला पर्याय नाही. कोणतंही क्षेत्र निवडा पण सर्वोच्च ठिकाणी पोहचा... असा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...