Skip to main content

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - १ ऑगस्ट 23

   सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती.1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संपदा _ पोवाडे व लावणी 15, नाटके 7, प्रवासवर्णन 1, कथा 21, कादंबरी 31, चित्रपट 7 एवढे साहित्य संपदा त्यांनी आपल्या 49 वर्षात केलेले दिसते. त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी, दलित शोषित, कामगारांचे जिवंत अनुभव मांडण्यासाठी त्यांनी आपली लेखणी हत्यारासारखी वापरली. त्यामुळेच त्यांचे साहित्य जन सामान्यांच्या काळजात आजही अजरामर आहे. त्यांच्या कथेचे नायक हे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधत्व करतात. 
सर्व सामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वांचिंतासाठी समाज प्रबोधन केले. लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्यसरकारचा  उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र चळवळीत जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान त्यांचे आहे. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असे आहे.अवघे दीड दिवस शाळेत शिक्षण घेवून त्यांनी  विशाल,अजरामर असे साहित्य निर्माण केले. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या मनामध्ये चेतना निर्माण करून स्फुल्लिंग पेटवले. अण्णाभाऊंच्या लेखणीने अनेक आंदोलनाला पाठबळ मिळाले त्याप्रकारे  आजच्या नव युवकांमधून तशी पावले उचलली जावीत . 
अण्णाभाऊ साठे  18 जुलै 1969 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Comments

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...