Skip to main content

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात.
हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव सुरक्षितस्थळी. परंतु खट्याळ पोराने जसे न ऐकता परत दुसऱ्या तूफानाला सामोरी जावे असा हा काहीसा अत्रेंच्या बाबतीत अनुभव आत्मचरित्र वाचतांना येत जातो. हा हिमतीचा बादशहा खरोखरच आर्थिकदृष्ट्या  कफल्लक असताना देखील केवळ कशावर तरला असेल तर फक्त स्वतः च्या हिमतीवर असलेल्या भरवशावर.
हिम्मत, स्वतः वर असलेला भरवसा हे काय असते, तो कसा टिकवायचा असतो हे ज्यांना  जाणायचे त्यांनी हे आत्मचरित्र वाचावे. शब्दांचे शक्ति, सामर्थ्य, वजन हे माहीत करून घ्यायचे तर क-हेचें  पाणी वाचले पाहिजे .
मी कसा झालो? मध्ये ही त्यांनी त्यांच्या बद्दल लिहले आहे.  मोरूची मावशी, तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी या सारख्या नाटकांतून सामाजिक प्रश्नांवर हसत हसत भाष्य करत डोळ्यांत अंजन घालत अंतर्मुख करायला लावणारे विषय हाताळले प्रवासवर्णन,  चरित्र, कादंबरी ही त्यांनी लिहिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई ह्या चित्रपटाला १९५४ साली राष्ट्रीय पुरस्कारात सुवर्ण कमळ मिळाले होते. ते .फर्डे वक्ते असल्यामुळे जनमानसावर प्रभाव होता. आपल्या वतृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकत. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
आचार्य अत्रे जीवनाबद्दल म्हणतात, " जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले. लहानपणाासून निसर्गाची अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या क-हेचें  काठी मी जन्मलो आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खडोबाच्या भांडाऱ्याने वाढलो, मोठा झालो. उशाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अध्टप्रहर पहारा करी, तर श्री सोपानदेवाची भक्तिवीणा सदैव वाजे" 

Comments

  1. Atre sarkhya diggaj lekhachya kreheche pani atmachritracha saraush vachnyas milala madam dhanyavad

    ReplyDelete
  2. आचार्य अत्रे यांचा सर्वच क्षेत्रात मुक्त संचार होता. त्यांनी कला, साहित्य, संगीत, राजकारण, नाटक,पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात मुक्तपणे संचार केला आहे. अत्रेंसारखा दुसरा तडफदार वक्ता होणे नाही. झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...