Skip to main content

गरुडझेप - भरत आंधळे

 यशस्वी कहाणी मागे वेदनादायी भूतकाळ असतो.... प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ' अग्निपंख' आत्मकथेच्या प्रस्तावनेत म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहतो . अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांना जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. आयुष्यात यश मिळवत असताना त्या व्यक्तीने केलेले कष्ट, सहन केलेली उपासमार हे जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा यावाक्याची प्रचिती येते. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर स्वप्न वास्तवात साकारू शकतो. अशीच एक ध्येयवेड्या स्वप्नाची आत्मकथा या पुस्तकातून आपण अनुभवतो.

अपयश यशाची पहिली पायरी आहे असे आपण म्हणतो परंतु अप यशाच्या अनेक पायऱ चढून गेल्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भरत आंधळे यांचा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच जीवन प्रेरणा देणारा आहे. गरुडझेप हे पुस्तक स्टडी सर्कलने प्रकाशित केले आहे दुसरी आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित असून किँमत १०० रू. आहे.या पुस्तकाची अक्षर मांडणी सुबक, वाचनीय स्वरूपाची असून पुस्तकाच्या आश्याला अनुसरून चित्रे दिली आहेत.
गरुडझेप यात धडा पहिला यात चेपलेल शिक्षण, चेपलेला मी, दुसरा धडा- गंगेत घोडं न्हालं, तिसरा धडा- संघर्षातून ध्येयाकडे, चौथा धडा- हाती आलेले सोडून पुन्हा ध्येयाकडे, आणि पाचव्या धड्यात ही फक्त झुंजुमुंजू पहाट उजेडायची आहे असे वर्णन केले आहे. लेखकाचा भूतकाळ, बालपण शिक्षणासाठी आजीची धडपड , कौटुंबिक पार्शवभूमी गरिबीची असूनही आपल्या नातवाने शिकून नोकरी करावी असे आजीला वाटत असते व ती त्यासाठी धडपड करते . दहावीत ५४ टक्के मार्कस मिळवून पास झालेले भरत आंधळे पुढे नाशिकला  एमआयडीसी वसाहतीत काम करून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. खिशात एक रुपया नसतांना नाशिक मध्ये एका ओळखीच्या ठिकाणी राहण्याची सोय  कशीतरी झालेली, वेळप्रसंगी  शिळ्या भाकरीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून खाल्ले, किराणा दुकानदाराने टाकून दिलेले शिळे पाव खावून दिवस काढले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या संपर्कामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार लेखकाच्या मनात आला व त्या दृष्टीने प्रयत्न केले. नाशिक ते पुणे यशदा, जयकर ग्रंथालय असा प्रवास सायकल वरून केला. कमवा शिका योजनेतून काम केले. पी एस आय ची परीक्षा पास झाल्या नंतर मुख्य परीक्षेत यश हुलकावणी देत होते. असे सगळे प्रसंग हा जीवन प्रवास किती रोमांचकारी होता हे वाचताना जाणवते. एकदा तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . पण एकदा त्यांनी विचार केला की  जेव्हाअंबादास सारखा विद्यार्थी वडील दगड फोडण्याचे काम करतात त्यांच्या कष्टाचे चीज करून नेट परीक्षा पास होवून प्राध्यापक होतो तर आपण का नाही करू शकत असा विचार करून  पुन्हा जोमाने युपीएससी परीक्षांचा अभ्यास करतात. लेखक " जगात वेडी समजली जाणारी माणसेच इतिहास घडवतात आणि स्वतः ला शहाणी समजणारी माणसे हा इतिहास नंतर वाचतात आणि त्यातून धडे घेतात"  या विचाराने शेवटचा प्रयत्न करतात व त्यात यश मिळवितात.कलेक्टर झाल्याची बातमी पहिल्यांदा आजीला कळवतात. असे अनेक प्रसंग वाचतांना आपण भावूक होतो.
आयुष्यातील स्वप्नपूर्तीचे दिवस अनुभवून सुद्धा लेखक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत आहेत. भरत आंधळे यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

Comments

  1. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे पुस्तक आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...