Skip to main content

गरुडझेप - भरत आंधळे

 यशस्वी कहाणी मागे वेदनादायी भूतकाळ असतो.... प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ' अग्निपंख' आत्मकथेच्या प्रस्तावनेत म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहतो . अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांना जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. आयुष्यात यश मिळवत असताना त्या व्यक्तीने केलेले कष्ट, सहन केलेली उपासमार हे जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा यावाक्याची प्रचिती येते. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर स्वप्न वास्तवात साकारू शकतो. अशीच एक ध्येयवेड्या स्वप्नाची आत्मकथा या पुस्तकातून आपण अनुभवतो.

अपयश यशाची पहिली पायरी आहे असे आपण म्हणतो परंतु अप यशाच्या अनेक पायऱ चढून गेल्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भरत आंधळे यांचा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच जीवन प्रेरणा देणारा आहे. गरुडझेप हे पुस्तक स्टडी सर्कलने प्रकाशित केले आहे दुसरी आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित असून किँमत १०० रू. आहे.या पुस्तकाची अक्षर मांडणी सुबक, वाचनीय स्वरूपाची असून पुस्तकाच्या आश्याला अनुसरून चित्रे दिली आहेत.
गरुडझेप यात धडा पहिला यात चेपलेल शिक्षण, चेपलेला मी, दुसरा धडा- गंगेत घोडं न्हालं, तिसरा धडा- संघर्षातून ध्येयाकडे, चौथा धडा- हाती आलेले सोडून पुन्हा ध्येयाकडे, आणि पाचव्या धड्यात ही फक्त झुंजुमुंजू पहाट उजेडायची आहे असे वर्णन केले आहे. लेखकाचा भूतकाळ, बालपण शिक्षणासाठी आजीची धडपड , कौटुंबिक पार्शवभूमी गरिबीची असूनही आपल्या नातवाने शिकून नोकरी करावी असे आजीला वाटत असते व ती त्यासाठी धडपड करते . दहावीत ५४ टक्के मार्कस मिळवून पास झालेले भरत आंधळे पुढे नाशिकला  एमआयडीसी वसाहतीत काम करून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. खिशात एक रुपया नसतांना नाशिक मध्ये एका ओळखीच्या ठिकाणी राहण्याची सोय  कशीतरी झालेली, वेळप्रसंगी  शिळ्या भाकरीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून खाल्ले, किराणा दुकानदाराने टाकून दिलेले शिळे पाव खावून दिवस काढले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या संपर्कामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार लेखकाच्या मनात आला व त्या दृष्टीने प्रयत्न केले. नाशिक ते पुणे यशदा, जयकर ग्रंथालय असा प्रवास सायकल वरून केला. कमवा शिका योजनेतून काम केले. पी एस आय ची परीक्षा पास झाल्या नंतर मुख्य परीक्षेत यश हुलकावणी देत होते. असे सगळे प्रसंग हा जीवन प्रवास किती रोमांचकारी होता हे वाचताना जाणवते. एकदा तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . पण एकदा त्यांनी विचार केला की  जेव्हाअंबादास सारखा विद्यार्थी वडील दगड फोडण्याचे काम करतात त्यांच्या कष्टाचे चीज करून नेट परीक्षा पास होवून प्राध्यापक होतो तर आपण का नाही करू शकत असा विचार करून  पुन्हा जोमाने युपीएससी परीक्षांचा अभ्यास करतात. लेखक " जगात वेडी समजली जाणारी माणसेच इतिहास घडवतात आणि स्वतः ला शहाणी समजणारी माणसे हा इतिहास नंतर वाचतात आणि त्यातून धडे घेतात"  या विचाराने शेवटचा प्रयत्न करतात व त्यात यश मिळवितात.कलेक्टर झाल्याची बातमी पहिल्यांदा आजीला कळवतात. असे अनेक प्रसंग वाचतांना आपण भावूक होतो.
आयुष्यातील स्वप्नपूर्तीचे दिवस अनुभवून सुद्धा लेखक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत आहेत. भरत आंधळे यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

Comments

  1. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे पुस्तक आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...