Skip to main content

जगाच्या पाठीवर - सुधीर फडके

सुप्रसिद्ध संगीतकार  कै.सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे अपुरे आत्मकथन. आपल्याला यशस्वी व्यक्तींना मिळालेले यश दिसते परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेले कष्ट दिसत नाही. सुधीर फडके. नावारूपाला येण्याआधी काय संघर्ष केला ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. त्यांना उत्तर आयुष्यात मिळालेले यश अपयश  त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तक सुद्धा लोकप्रियतेचे  उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.यांचे मूळ नाव रवींद्र विनायक फडके. भटकत आणि कंगाल अवस्थेतही संगीत साधना करीत राहिलेला एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. हे आत्मचरित्र संपूर्ण नाही. या पुस्तकात ललिता फडके यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी असंख्य दुर्मिळ छायाचित्रे यांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत भर पडली आहे. संगीताशी कधीच संबंध आला नाही तरी देखील बाबूजींनी मरण यातना भोगल्या व संगीताची नाळ कायम जोडलेली ठेवली.
 घरच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या , मित्रांच्या आधारावर जगायला लावलं. उपासमार सहन करावी लागली, भूक काय असते तिची किँमत काय असते, माणसाला वेड लागते म्हणजे काय होते कधी आत्महत्या करून सुटका करावी असे विचार त्यांच्या मनात येत होते. उधार उसनवार करून गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरायचा त्यांनी केलेला प्रयत्न दिसतो. प्रत्येक वेळी नियती मात्र आशा, निराशा यश अपयश हेलकावे देत होती हे वाचून अंगावर काटा येतो. तोल न जाऊ देता मान अपमान, दुःख, दारिद्र इत्यादी शब्दांचा खरा अर्थ जगत अनुभूती घेतली. इतका खडतर प्रवास, अनेकदा मृत्यूला सामोरी जावेला लागलं . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणे तरीही संगीता बद्दल कुठे तरी मनात विश्वास, आस्था जपणे, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे हे गीत जणू त्यांच्या जीवनाला चपखलपणे लागू होणारे आहे. राजहंस प्रकाशनाने २००३ मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. गीत रामायण ज्यांनी अजरामर करून ठेवले त्या बाबूजीचे आत्मचरित्र मनाला चटका लावून जाते.

Comments

  1. गीतरामायण ही अभिजात आणि उत्कृष्ट संगीत कलाकृती आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...