Skip to main content

जगाच्या पाठीवर - सुधीर फडके

सुप्रसिद्ध संगीतकार  कै.सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे अपुरे आत्मकथन. आपल्याला यशस्वी व्यक्तींना मिळालेले यश दिसते परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेले कष्ट दिसत नाही. सुधीर फडके. नावारूपाला येण्याआधी काय संघर्ष केला ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. त्यांना उत्तर आयुष्यात मिळालेले यश अपयश  त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तक सुद्धा लोकप्रियतेचे  उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.यांचे मूळ नाव रवींद्र विनायक फडके. भटकत आणि कंगाल अवस्थेतही संगीत साधना करीत राहिलेला एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. हे आत्मचरित्र संपूर्ण नाही. या पुस्तकात ललिता फडके यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी असंख्य दुर्मिळ छायाचित्रे यांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत भर पडली आहे. संगीताशी कधीच संबंध आला नाही तरी देखील बाबूजींनी मरण यातना भोगल्या व संगीताची नाळ कायम जोडलेली ठेवली.
 घरच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या , मित्रांच्या आधारावर जगायला लावलं. उपासमार सहन करावी लागली, भूक काय असते तिची किँमत काय असते, माणसाला वेड लागते म्हणजे काय होते कधी आत्महत्या करून सुटका करावी असे विचार त्यांच्या मनात येत होते. उधार उसनवार करून गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरायचा त्यांनी केलेला प्रयत्न दिसतो. प्रत्येक वेळी नियती मात्र आशा, निराशा यश अपयश हेलकावे देत होती हे वाचून अंगावर काटा येतो. तोल न जाऊ देता मान अपमान, दुःख, दारिद्र इत्यादी शब्दांचा खरा अर्थ जगत अनुभूती घेतली. इतका खडतर प्रवास, अनेकदा मृत्यूला सामोरी जावेला लागलं . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणे तरीही संगीता बद्दल कुठे तरी मनात विश्वास, आस्था जपणे, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे हे गीत जणू त्यांच्या जीवनाला चपखलपणे लागू होणारे आहे. राजहंस प्रकाशनाने २००३ मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. गीत रामायण ज्यांनी अजरामर करून ठेवले त्या बाबूजीचे आत्मचरित्र मनाला चटका लावून जाते.

Comments

  1. गीतरामायण ही अभिजात आणि उत्कृष्ट संगीत कलाकृती आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...