Skip to main content

जगाच्या पाठीवर - सुधीर फडके

सुप्रसिद्ध संगीतकार  कै.सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे अपुरे आत्मकथन. आपल्याला यशस्वी व्यक्तींना मिळालेले यश दिसते परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेले कष्ट दिसत नाही. सुधीर फडके. नावारूपाला येण्याआधी काय संघर्ष केला ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. त्यांना उत्तर आयुष्यात मिळालेले यश अपयश  त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तक सुद्धा लोकप्रियतेचे  उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.यांचे मूळ नाव रवींद्र विनायक फडके. भटकत आणि कंगाल अवस्थेतही संगीत साधना करीत राहिलेला एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. हे आत्मचरित्र संपूर्ण नाही. या पुस्तकात ललिता फडके यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी असंख्य दुर्मिळ छायाचित्रे यांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत भर पडली आहे. संगीताशी कधीच संबंध आला नाही तरी देखील बाबूजींनी मरण यातना भोगल्या व संगीताची नाळ कायम जोडलेली ठेवली.
 घरच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या , मित्रांच्या आधारावर जगायला लावलं. उपासमार सहन करावी लागली, भूक काय असते तिची किँमत काय असते, माणसाला वेड लागते म्हणजे काय होते कधी आत्महत्या करून सुटका करावी असे विचार त्यांच्या मनात येत होते. उधार उसनवार करून गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरायचा त्यांनी केलेला प्रयत्न दिसतो. प्रत्येक वेळी नियती मात्र आशा, निराशा यश अपयश हेलकावे देत होती हे वाचून अंगावर काटा येतो. तोल न जाऊ देता मान अपमान, दुःख, दारिद्र इत्यादी शब्दांचा खरा अर्थ जगत अनुभूती घेतली. इतका खडतर प्रवास, अनेकदा मृत्यूला सामोरी जावेला लागलं . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणे तरीही संगीता बद्दल कुठे तरी मनात विश्वास, आस्था जपणे, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे हे गीत जणू त्यांच्या जीवनाला चपखलपणे लागू होणारे आहे. राजहंस प्रकाशनाने २००३ मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. गीत रामायण ज्यांनी अजरामर करून ठेवले त्या बाबूजीचे आत्मचरित्र मनाला चटका लावून जाते.

Comments

  1. गीतरामायण ही अभिजात आणि उत्कृष्ट संगीत कलाकृती आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...