Skip to main content

जागतिक महिला दिन - 8 मार्च

जागतिक महिला दिन - सन्मान स्त्री शक्तीचा 
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या  कर्तृत्वाचा आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या समान हक्काचा गौरव करण्याचा दिवस आहे. हा केवळ कॅलेंडरचा एक दिवस नसून तर तो उत्सव आहे त्या शक्तीचा  जिने जगाला आकार दिला. एकेकाळी चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली स्त्री आज त्या चौकटी मोडून बाहेर पडली आहे. आज एकही असं क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपला ठसा उमटवला नाही. ती केवळ घराची लक्ष्मीच नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील बनत आहे. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक असून तिच्या योगदानाशिवाय जगाची प्रगती होणे अशक्य आहे.
इतिहास -
महिलादिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. न्यूयॉर्क मधील महिला कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यांच्या या संघर्षाला यश आले आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक महिला दिन' म्हणून घोषित केला.
स्त्री: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व -
स्त्रीमध्ये सहनशीलता आहे म्हणून ती दुर्बल नाही. ती सृजन करू शकते आणि वेळ पडली तर अन्यायाविरुद्ध 
' रणरागिणी' सुद्धा बनू शकते. सावित्रीबाई फुलेंनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वातून लखलखत आहे . आजच्या काळात स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे. भारतात जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कल्पना चावला यासारख्या अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला आहे.आजची स्त्री ही केवळ घराची चौकट सांभाळणारी गृहिणी राहिलेली नाही, तर ती आकाशाला गवसणी घालणारी अंतराळवीर आहे, सीमेवर रक्षण करणारी सैनिक आहे आणि देशाला दिशा देणारी राजकारणीही आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची जी ज्योत पेटवली, तिचेच फळ आज आपण पाहत आहोत.
स्त्री ही त्याग, प्रेम आणि बुद्धिमत्तेचा त्रिवेणी संगम आहे. तिचा सन्मान केवळ एका दिवसा पुरता मर्यादित न ठेवता, तो आपल्या संस्काराचा भाग व्हायला हवा!



Comments

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...