Skip to main content

एक होता कार्व्हर- अनुवाद वीणा गवाणकर

प्रिय वाचकांनो आज आपण ' एक होता कार्व्हर' या चरित्र पुस्तकाची ओळख घेणार आहोत.वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कार्व्हर यांची जीवनकहाणी. प्रकाशक दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, किँमत १५० रू.
अमेरिकेतील मिझुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह वाड्यावर मोझेस कार्व्हर आपल्या कुटुंबासह आणि मेरी नावाच्या गुलाम निग्रो स्त्री तिच्या दोन मुलांसह राहत होते.१८६०- ६२ दरम्यान मेरीला तिच्या एका मुलासोबत एका टोळीने रातोरात पळवून  नेली. मोझेस यांनी घोड्यांच्या बदल्यात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त २ महिन्यांचा मुलगा मिळाला.निग्रोना त्याकाळी अमेरिकेत गुलाम म्हणून वागवले जायचे. मोझेस कार्व्हर सोबत निसर्गात हे अनाथ पोर वाढत होते. लहानणापासूनच रानावनात झाड झुडपे, पक्षांची पिल्ली, मासे यांच्या सोबतच मेरीचे पोर वाढत होते. या मेरीच्या पोराची प्रामाणिक व विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबात त्याचं नामकरण केलं - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. निसर्ग शाळेत शिकत असताना वनस्पतींशी जास्त परिचय होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेण्यासाठी स्वयंपाक, लाँड्री, बागकाम, गिरणीत काम, सरपण फोडून देणे, अंगण झाडून देणे,  गटार खणली,अशी अनेक कामे केली. अनेकदा झोपण्यासाठी गोठ्याचा वापर केला. दारिद्र्याने भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा असल्याने कष्ट करून शिक्षण घेत राहिले. वनस्पतीशास्त्र व कृषी रसायन, भूमिती, प्राणीशास्त्र यशाखांचा अभ्यास केला. कितीतरी अधिक ज्ञान प्रत्यक्ष निसर्गातून मिळविले आणि त्यामुळेच इतरांच्या पुढे अभ्यासात असतं.१८९४ साली आयोवा स्टेट कॉलेज मधून विज्ञान शाखेची पदवी मिळवून पुढे त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले. कृषिवर आधारित संशोधन त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. शेती विकासासाठी वेगवेगळे प्रयोग केले. सेंद्रिय शेती, खत, संकल्पना प्रत्यक्षात आणली ती १८९६ मध्ये. ज्याची गरज आपल्याला आपणास १२० वर्षांनी जाणवते यातच त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.
यशाची एक एक पायरी चढत असताना त्यांनी जमिनीशी नात घट्ट ठेवले व शेती विषयक क्षेत्रात उच्चशिक्षण पूर्ण केले. लोकांच्या आजारावर उपलब्ध वनस्पतींचा वापर व त्याची माहिती सर्वांना करून देणे, मातीतून नीळा रंग शोधून काढला हे संशोधन  पेटंट घेवून ते श्रीमंत झाले नाही तर ते संशोधन गरीब जनतेला उपलब्ध करून दिले तेही त्यांना परवडणाऱ्या किमतीत. शेंगदाणा पासून तेल, डिंक, रबर वस्तू तयार केल्या. वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. भुईमुग, रताळ
 यापासून तब्बल ५०० च्यावर जीवनोपयोगी वस्तू तयार केल्या. आणि जगाच्या पाठीवर ज्यान इतिहासात सोनेरी कर्तृत्व केलं असे हे कार्व्हर . जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाने केले नसेल एवढे कृषी संशोधन एकट्या कार्व्हर यांनी केले. प्रा. कार्व्हर हे शेती शास्त्रज्ञ तर होतेच ते अर्थशास्त्रज्ञ ही होते. शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती शिकविल्या.वाळवा, सुकवा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात कोणते अन्नपदार्थ टिकविता येतात याचा याद्या प्रसिद्ध केल्या. अविवाहित कार्व्हरला पैशाचा मोह नव्हता त्यानी संशोधन केंद्रातील पगारवाढ घेतली नाही . शास्त्रज्ञ एडिसनने देवू केलेली एक लाख डॉलरची विनंती देखील मान्य केली नाही. त्यासाठी त्यांना न्यूजर्सीला जावे लागणार होते याबाबत कार्व्हर म्हणतात ' माझी माझ्या बांधवांना जास्त गरज आहे' काय अजब रसायन आहे माती अन माणसांची नाळ कायम ठेवणार! नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृध्दीच गमक आहे कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलं नाही तर त्याचा वस्तुपाठच घालून दिला आणि हा वस्तुपाठ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.!ह्या पुस्तकाला उत्कृष्ठ वाडमय पुरस्कार 1981-82 यावर्षी मिळालेला आहे.

Comments

  1. थोर महात्मे होऊनी गेले चरित्र त्यांचे पहावे जरा, आपणही त्यांच्यासमान व्हावे हाचि सापडे बोध खरा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...