Skip to main content

एक होता कार्व्हर- अनुवाद वीणा गवाणकर

प्रिय वाचकांनो आज आपण ' एक होता कार्व्हर' या चरित्र पुस्तकाची ओळख घेणार आहोत.वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कार्व्हर यांची जीवनकहाणी. प्रकाशक दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, किँमत १५० रू.
अमेरिकेतील मिझुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह वाड्यावर मोझेस कार्व्हर आपल्या कुटुंबासह आणि मेरी नावाच्या गुलाम निग्रो स्त्री तिच्या दोन मुलांसह राहत होते.१८६०- ६२ दरम्यान मेरीला तिच्या एका मुलासोबत एका टोळीने रातोरात पळवून  नेली. मोझेस यांनी घोड्यांच्या बदल्यात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त २ महिन्यांचा मुलगा मिळाला.निग्रोना त्याकाळी अमेरिकेत गुलाम म्हणून वागवले जायचे. मोझेस कार्व्हर सोबत निसर्गात हे अनाथ पोर वाढत होते. लहानणापासूनच रानावनात झाड झुडपे, पक्षांची पिल्ली, मासे यांच्या सोबतच मेरीचे पोर वाढत होते. या मेरीच्या पोराची प्रामाणिक व विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबात त्याचं नामकरण केलं - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. निसर्ग शाळेत शिकत असताना वनस्पतींशी जास्त परिचय होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेण्यासाठी स्वयंपाक, लाँड्री, बागकाम, गिरणीत काम, सरपण फोडून देणे, अंगण झाडून देणे,  गटार खणली,अशी अनेक कामे केली. अनेकदा झोपण्यासाठी गोठ्याचा वापर केला. दारिद्र्याने भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा असल्याने कष्ट करून शिक्षण घेत राहिले. वनस्पतीशास्त्र व कृषी रसायन, भूमिती, प्राणीशास्त्र यशाखांचा अभ्यास केला. कितीतरी अधिक ज्ञान प्रत्यक्ष निसर्गातून मिळविले आणि त्यामुळेच इतरांच्या पुढे अभ्यासात असतं.१८९४ साली आयोवा स्टेट कॉलेज मधून विज्ञान शाखेची पदवी मिळवून पुढे त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले. कृषिवर आधारित संशोधन त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. शेती विकासासाठी वेगवेगळे प्रयोग केले. सेंद्रिय शेती, खत, संकल्पना प्रत्यक्षात आणली ती १८९६ मध्ये. ज्याची गरज आपल्याला आपणास १२० वर्षांनी जाणवते यातच त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.
यशाची एक एक पायरी चढत असताना त्यांनी जमिनीशी नात घट्ट ठेवले व शेती विषयक क्षेत्रात उच्चशिक्षण पूर्ण केले. लोकांच्या आजारावर उपलब्ध वनस्पतींचा वापर व त्याची माहिती सर्वांना करून देणे, मातीतून नीळा रंग शोधून काढला हे संशोधन  पेटंट घेवून ते श्रीमंत झाले नाही तर ते संशोधन गरीब जनतेला उपलब्ध करून दिले तेही त्यांना परवडणाऱ्या किमतीत. शेंगदाणा पासून तेल, डिंक, रबर वस्तू तयार केल्या. वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. भुईमुग, रताळ
 यापासून तब्बल ५०० च्यावर जीवनोपयोगी वस्तू तयार केल्या. आणि जगाच्या पाठीवर ज्यान इतिहासात सोनेरी कर्तृत्व केलं असे हे कार्व्हर . जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाने केले नसेल एवढे कृषी संशोधन एकट्या कार्व्हर यांनी केले. प्रा. कार्व्हर हे शेती शास्त्रज्ञ तर होतेच ते अर्थशास्त्रज्ञ ही होते. शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती शिकविल्या.वाळवा, सुकवा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात कोणते अन्नपदार्थ टिकविता येतात याचा याद्या प्रसिद्ध केल्या. अविवाहित कार्व्हरला पैशाचा मोह नव्हता त्यानी संशोधन केंद्रातील पगारवाढ घेतली नाही . शास्त्रज्ञ एडिसनने देवू केलेली एक लाख डॉलरची विनंती देखील मान्य केली नाही. त्यासाठी त्यांना न्यूजर्सीला जावे लागणार होते याबाबत कार्व्हर म्हणतात ' माझी माझ्या बांधवांना जास्त गरज आहे' काय अजब रसायन आहे माती अन माणसांची नाळ कायम ठेवणार! नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृध्दीच गमक आहे कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलं नाही तर त्याचा वस्तुपाठच घालून दिला आणि हा वस्तुपाठ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.!ह्या पुस्तकाला उत्कृष्ठ वाडमय पुरस्कार 1981-82 यावर्षी मिळालेला आहे.

Comments

  1. थोर महात्मे होऊनी गेले चरित्र त्यांचे पहावे जरा, आपणही त्यांच्यासमान व्हावे हाचि सापडे बोध खरा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...