Skip to main content

बलुतं - दया पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे दया पवारांचे बलुतं हे पुस्तक मराठी साहित्यात महत्वाचे मानले जाते. दया पवारांना वाटतं त्याप्रमाणे यांचं जगणं म्हणजे एक कोंडवाडा आहे. समाजातील ज्या घटकाला वर्षानुवर्षे  गावकुसा बाहेर ढकलले गेले त्या घटकातील माणसांची एका विशिष्ट कालखंडातील जगण्याची धडपड बलुतं या आत्मकथानकातून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झाली आहे. अत्यंत अन्यायकारक समाज व्यवस्थेमुळे वाट्याला आलेलं दुःखाचं बलुतं कुणाला सांगू नये इतकं दाहक आहे. हे दुःख मानवनिर्मित आहे. सदर आत्मकथेतील कालखंड १९४० च्या सुमाराचा आहे. बाबासाहेबांनी जागृती सुरू केली तो हा काळ. आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण बलुतंमधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार याचे आहे. हे मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्र आहे. दलित समाजातील हळुहळु होणारे बदल तसेच मुंबई शहर बद्दलची माहिती देखील आलेली आहे. स्वतः ला कमी लेखणाऱ्या या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर दगडू  मारुती पवारांचं बालपण कधी खेड्यात तर कधी शहरात गेले . दगडूचे वडील दादा मुंबईला सुक्या गोदीत कामाला होते. मुंबईला कावाखाना इथे ते राहत. एका बाजूला चोरबजार तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. नागपाड्याच्या म्यूनसिपल शाळेत दगडूच शिक्षणझालेलं.
लेखकाची आई कागद गोळा करायची. पगार झाला की वडील गायब व्हायचे. वडिलांची तब्ब्येत खालावली त्यामुळे नोकरी सुटते व परत गावी येतात. शाळेत शिक्षकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी संदर्भात माहिती मिळते. इकडे वडिलांचं आजारपण वाढत जातं. अंगार, धुपारे, मांत्रिक उपचार सुरू असतात मात्र दवाखान्यात दाखल करण्यात येत नाही तशी मानसिकताच नसते. त्यामुळे वडिलांचे निधन होतो . एखाद्या समाजातील लोकं केवळ अज्ञानामुळे असे हाल होवून मरतात ही गोष्ट वाचकाला अस्वस्थं करून जाते. आत्मकथनात वर्णन केलेला महारवाडा बाबासाहेबांची सामाजिक चळवळ सुरू झाली त्याकाळातला आहे. हा महारवाडा काळजावर जखम व्हावी असा आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई कंबर कसते. बाबासाहेबांचे विचार तिने ऐकलेले असतात. कुठेतरी शिक्षणाचे महत्त्व तिला जाणवते . ती लेखकाला शिक्षणासाठी तालुक्याला पाठवते. शिक्षणामुळे दगडूच्या आचारात, विचारात फरक पडतो. पुढे नोकरी करतात. आपल्या आईने मार्केट मध्ये कागद वेचू नये त्यांनी आपली अप्रतिष्ठा होते असे त्यांना वाटते. लेखकाचे म्हणणे कितीही खरे असले तरी आईने ऐकायला तर हवे? आई मुलाचा हा संघर्ष निव्वळ दोन पिढ्यांतील नाही तर सामाजिक स्तरातला देखील आहे. 
आत्मकथनातून येणाऱ्या निरनिराळ्या व्यक्तीरेखातून समाजाच्या स्तरातला सामाजिक आणि सांस्कृतिक फरक लक्षात येतो. या बदलामुळे सुशिक्षित झाल्यावर लेखकाची होणारी भावनिक कुचंबणा वाचकाला  व्यथित करते.या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...