Skip to main content

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

1936 साली  प्रथम प्रकाशित झालेले स्मृतिचित्रे झालेले हे पुस्तक आज 85  वर्षे झाली तरी वाचकांना तितकेच भावते आहे. लक्ष्मीबाईंनी गप्पा मारताना हकीकती सांगाव्यात तशी ही स्मृतिचित्रे रेखाटली आहे. लक्ष्मीबाईचे लहानपणीचे नाव मनकर्णिका. त्यांचे 11 व्याा वर्षीच लग्न झाले व त्यांचे नाव मनकर्णिका गोखले चे लक्ष्मीबाई नारायण टिळक झाले. यात लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या आठवणी सांगताना कायम त्यांचा उल्लेख ' टिळक' असा करतात. त्यांनी सांगितलेल्या आठवणीत लहानसहान प्रसंगातील नाट्य पकडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पुढे आपल्या मुलाच्या सांगण्यावरून त्या लिहू लागतात. आठवणी लिहू लागल्यावर त्या सुचेल तसं ते कधी खडूने, तर कधी कोळशाने जमिनीवर लिहून काढीत त्या बोलत तशाच लिहीत. हा लेखन प्रकार त्या काळात वेगळाच होता. अखेर १९३४ साली स्मृतिचित्रेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. 
लग्नानंतर पितृसत्ताक  जीवन पद्धती काळात आजची तरुण पिढी कल्पना देखील करू शकणार नाही इतकी विचित्र. स्त्रियांना साधी लुगडी घ्यायची तरी घरातील कर्त्या पुरुषावर अवलंबून रहावे लागे. लक्ष्मीबाईच्या ललाटी देखील सुरुवातीला तेच होते. सासरे स्वभावाने तिरपागडे त्यात टिळक मध्येच गायब होत. एका ठिकाणी शिक्षकाची नोकरी करत तिथे एका योग्याच्या नादी लागले. भर दिवसा रानावनात जावून ध्यान करत तर कधी नदीत बसून गुरुमंत्र म्हणत. टिळक लक्ष्मीबाईंनी शिकावे म्हणून पुस्तके घेवून जातात व शिकवताना लक्ष्मी बाई हसतात तर सगळी पुस्तके फाडून जाळून टाकतात असे टिळक रागीट.
राजनांदगाव येथील दोन वर्षात टिळकांच्या मनःस्थितीत बराच बदल होतो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित व तो धर्म स्वीकारतात. मात्र लक्ष्मीबाई हिंदूच राहतात. पुढचा संसाररथ आता दोन चाके भिन्न विचारधारांची असतात. त्या घराला आता भिन्न प्रवृत्तीच्या माणसांचे अनेक दाहक अनुभव येतात हा सारा भाग अतिशय प्रांजळपणे पुस्तकात आलेला आहे. अत्यंत कठीण आणि परीक्षेचा काळ! याकाळाशी त्यांनी दिलेली झुंज वाचकाला अंतर्मुख करते. कथानकाच्या ओघात बालकवींच्या आठवणी, पतीचा मृत्यू, दुष्काळातील समाजसेवा, कराचीतील वास्तव्य यागोष्टी अतिशय प्रभावीपणे येतात.
आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाची तुलना महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकांशी केली. ते म्हणतात " महात्मा गांधीनी सत्याचे प्रयोग लिहताना जो मोकळेपणा आणि निर्भयता दाखवली, तीच गोष्ट स्मृतिचित्रेमध्ये आढळते. आज एवढ्या वर्षानंतर देखील वाचकांचे या पुस्तकावर निस्सीम प्रेम आहे.

Comments

  1. अतिशय निर्व्याज आणि आपुलकीने,प्रांजळपणे लिहिलेले हे चरित्र आहे. साधी,सोपी,घरगुती वळणाची,अनलंकृत मराठी भाषा,ना. वा
    टिळकांसारखा तिरसट व विचित्र स्वभावाचा नवरा,सोवळे-ओवळे.... तरीही जीवनावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीबाईचे चरित्र म्हणजे खरोखरच आठवणीतील सुखद ठेवा आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकप्रेमा बद्दल .....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले. राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते. त्यांच्या  या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके  होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास  घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून  त्यांना विनम्र अभिवादन! संदर्भ.... https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-...