Skip to main content

माय लाईफ ( An Elestreted Biography)_ लेखक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले चरित्र. रूपा पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले या पुस्तकाची पृष्ठे ११९ असून किंमत रू २९५ एवढी आहे.
अग्निपंख हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत असेलच. माय लाईफ हे त्यांचे चरित्र पुस्तकाची छपाई आकर्षक असून त्यात भरपूर चित्रे आहेत.या पुस्तकात कलाम यांनी अनेक महत्तवपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यावेळेस SLV ३ यशस्वी उड्डाण झाले त्यानंतर इंदिराजीनी त्यांना भेटावयास बोलावले तेव्हा त्यांनी आपले गुरू सतीश धवन यांना कोणते कपडे घालायचे  असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले कोणतेही कपडे घाल. तुला मिळालेले यश हे महत्वाचे आहे कपडे नाहीत.हा उपदेश त्यांनी  आयुष्यभर लक्षात ठेवला. केव्हाही त्यांचे वकपडे म्हणजे जास्तीत जास्त तीन सुट व ५/६ शर्ट .
डॉ. कलाम हे सदैव तरुणांना प्रेरणा देत. म्हणून आजही अनेक तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत.भारतातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याप्रती आदर आहे. जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.. संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवणारे त्यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात अाली तेव्हा त्यांनी ती नाकारली. सध्या चालू संशोधनाला अधिक त्यांची गरज आहे असे सांगितले.
डॉ. कलाम यांनी या पुस्तकात तरुणांना पुढील उपदेश केला आहे -- १ आपल्या जीवनाचे ध्येय ठरवा.२ आयुष्यात मिळविता येईल तेवढे ज्ञान मिळवा ३ मनापासून कष्ट करा. ४ नेहमी उत्तम पुस्तके वाचा.५ स्वतः ला विचारा आपल्या मृत्यूनंतर लोक आपली कुठली गोष्ट लक्षात ठेवतील.
डॉ. अब्दुल कलाम धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढले. राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना ३७ लोकांना निमंत्रण पाठवली होती. त्यात त्यांच्या मोठा भाऊ, रामेश्वरम् मंदिराचे पुजारी, आणि गावातील तरुण इमाम व अनेक शिक्षक होते. डॉ. कलाम यांचे नातेवाईक राष्ट्रपती भवनात काही दिवस राहिले ते गेल्यावर त्यांच्या पाहुणचारचा खर्च सरकारी तिजोरीत भरला. दरवर्षी रमजान महिन्यात राष्ट्रपती इफ्तार पार्टी करतात कलाम यांनी ते बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चा एवढ्या किमतीचे धान्य गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात द्यायला लावले होते. 
ज्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला व आलेल्या परिस्थितीशी सामना करून ज्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले. अशा व्यक्तिमत्वाचे हे प्रेरणा देणारे चरित्र ' माय लाईफ ( An Elestreted Biography).
संदर्भ _ महाराष्ट्र टाइम्स.

Comments

  1. Madam you have taken good effort for this , reader get brief detail about this book.Best wishes for you efforts .

    ReplyDelete
  2. भारत हा देश एक दिवस महासत्ता होईल अशी स्वप्ने काही लोकांनी पाहिली होती त्यापैकी एक म्हणजेच भारताचे महान राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम. तरुणाईला अतिशय प्रेरणादायी असे हे चरित्र आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...