Skip to main content

माय लाईफ ( An Elestreted Biography)_ लेखक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले चरित्र. रूपा पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले या पुस्तकाची पृष्ठे ११९ असून किंमत रू २९५ एवढी आहे.
अग्निपंख हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत असेलच. माय लाईफ हे त्यांचे चरित्र पुस्तकाची छपाई आकर्षक असून त्यात भरपूर चित्रे आहेत.या पुस्तकात कलाम यांनी अनेक महत्तवपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यावेळेस SLV ३ यशस्वी उड्डाण झाले त्यानंतर इंदिराजीनी त्यांना भेटावयास बोलावले तेव्हा त्यांनी आपले गुरू सतीश धवन यांना कोणते कपडे घालायचे  असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले कोणतेही कपडे घाल. तुला मिळालेले यश हे महत्वाचे आहे कपडे नाहीत.हा उपदेश त्यांनी  आयुष्यभर लक्षात ठेवला. केव्हाही त्यांचे वकपडे म्हणजे जास्तीत जास्त तीन सुट व ५/६ शर्ट .
डॉ. कलाम हे सदैव तरुणांना प्रेरणा देत. म्हणून आजही अनेक तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत.भारतातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याप्रती आदर आहे. जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.. संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवणारे त्यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात अाली तेव्हा त्यांनी ती नाकारली. सध्या चालू संशोधनाला अधिक त्यांची गरज आहे असे सांगितले.
डॉ. कलाम यांनी या पुस्तकात तरुणांना पुढील उपदेश केला आहे -- १ आपल्या जीवनाचे ध्येय ठरवा.२ आयुष्यात मिळविता येईल तेवढे ज्ञान मिळवा ३ मनापासून कष्ट करा. ४ नेहमी उत्तम पुस्तके वाचा.५ स्वतः ला विचारा आपल्या मृत्यूनंतर लोक आपली कुठली गोष्ट लक्षात ठेवतील.
डॉ. अब्दुल कलाम धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढले. राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना ३७ लोकांना निमंत्रण पाठवली होती. त्यात त्यांच्या मोठा भाऊ, रामेश्वरम् मंदिराचे पुजारी, आणि गावातील तरुण इमाम व अनेक शिक्षक होते. डॉ. कलाम यांचे नातेवाईक राष्ट्रपती भवनात काही दिवस राहिले ते गेल्यावर त्यांच्या पाहुणचारचा खर्च सरकारी तिजोरीत भरला. दरवर्षी रमजान महिन्यात राष्ट्रपती इफ्तार पार्टी करतात कलाम यांनी ते बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चा एवढ्या किमतीचे धान्य गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात द्यायला लावले होते. 
ज्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला व आलेल्या परिस्थितीशी सामना करून ज्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले. अशा व्यक्तिमत्वाचे हे प्रेरणा देणारे चरित्र ' माय लाईफ ( An Elestreted Biography).
संदर्भ _ महाराष्ट्र टाइम्स.

Comments

  1. Madam you have taken good effort for this , reader get brief detail about this book.Best wishes for you efforts .

    ReplyDelete
  2. भारत हा देश एक दिवस महासत्ता होईल अशी स्वप्ने काही लोकांनी पाहिली होती त्यापैकी एक म्हणजेच भारताचे महान राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम. तरुणाईला अतिशय प्रेरणादायी असे हे चरित्र आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...