Skip to main content

सत्याचे प्रयोग- मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे आत्मकथन सत्याचे प्रयोग या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहे. वरदा प्रकाशन ने प्रकाशित केले आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन आहे.या पुस्तकाची गणना २० व्या शतकात महत्वाच्या पुस्तकात केली गेलेली आहे.
महात्मा गांधी यांनी जीवनभर कशी वाटचाल केली याचा मागोवा यात घेतला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक आहे. यात गांधीजींनी त्यांच्या लहानणापासून ते १९२१ पर्यंतचे आयुष्य रेखाटलेले आहे.या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः गांधीजींनी लिहली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की येरवडा कारागृहातील सहकारी कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी बालपणात वाचलेली दोन पुस्तके त्यांचा परिणाम खूप होता असे सांगितले सत्यवान हरिशचंद्र या पुस्तकाचा प्रभाव तर एवढा होता की ते स्वतः ला हरिशचंद्र समजून अनेकवेळा कल्परंजन करीत. तसेच गीतेचे ७०० श्लोक कसे दृढनिश्चयाने पाठ केले याचे ही  वर्णन केले आहे.
गांधीजींचे आयुष्य उघड्या पुस्तका सारखे होते. त्यांनी आयुष्यातील धक्कादायक गोष्टी समाजापासून लपवून ठेवल्या नाहीत त्यांनी त्या आपल्या आत्मचित्रात लिहून जगाला सांगितल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना याव्यक्तीला आपण केलेली चोरी, वासना आदी गोष्टी याची वाच्यता जाहीर करताना संकोच वाटला नाही. " मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो आता काय करावे कळेना. शेवटी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे" असे  ठरवून वडिलांना सांगणारा मोहन आपल्यातीलच एक वाटतो.
ब्रह्मचर्य हा केवळ देहाचा अलंकार नाही ती मनाची उत्तुंगता आहे हे उत्तुंगपण आपण अजुन मिळवू शकलो नाही असा संशय असल्याने स्वतः ची परीक्षा घेण्यासाठी गांधीजींनी अखेरच्या पर्वात सत्याचे प्रयोग करून पाहिले त्यासाठी त्यांनी आपली प्रतिमा पणाला लावली .आपली ही परीक्षा त्यांनी जगापासून लपविली नाही. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे सांगणाऱ्या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे. आपलं पूर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या सामान्य माणसा सारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्वा पर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच आणि आपणही असे काही असामान्य करू शकतो याची न कळत स्फूर्ती मिळते.

Comments

  1. सत्य हा या आत्मचरित्राचा गाभा आहे. महात्मा गांधी सारखा माणूस या पृथ्वीतलावर जन्माला येऊन गेला यावर कदाचित पुढील पिढी विश्वास ठेवणार नाही असे महान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले होते ते हे पुस्तक वाचल्यानंतर खरे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...