Skip to main content

सत्याचे प्रयोग- मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे आत्मकथन सत्याचे प्रयोग या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहे. वरदा प्रकाशन ने प्रकाशित केले आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन आहे.या पुस्तकाची गणना २० व्या शतकात महत्वाच्या पुस्तकात केली गेलेली आहे.
महात्मा गांधी यांनी जीवनभर कशी वाटचाल केली याचा मागोवा यात घेतला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक आहे. यात गांधीजींनी त्यांच्या लहानणापासून ते १९२१ पर्यंतचे आयुष्य रेखाटलेले आहे.या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः गांधीजींनी लिहली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की येरवडा कारागृहातील सहकारी कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी बालपणात वाचलेली दोन पुस्तके त्यांचा परिणाम खूप होता असे सांगितले सत्यवान हरिशचंद्र या पुस्तकाचा प्रभाव तर एवढा होता की ते स्वतः ला हरिशचंद्र समजून अनेकवेळा कल्परंजन करीत. तसेच गीतेचे ७०० श्लोक कसे दृढनिश्चयाने पाठ केले याचे ही  वर्णन केले आहे.
गांधीजींचे आयुष्य उघड्या पुस्तका सारखे होते. त्यांनी आयुष्यातील धक्कादायक गोष्टी समाजापासून लपवून ठेवल्या नाहीत त्यांनी त्या आपल्या आत्मचित्रात लिहून जगाला सांगितल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना याव्यक्तीला आपण केलेली चोरी, वासना आदी गोष्टी याची वाच्यता जाहीर करताना संकोच वाटला नाही. " मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो आता काय करावे कळेना. शेवटी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे" असे  ठरवून वडिलांना सांगणारा मोहन आपल्यातीलच एक वाटतो.
ब्रह्मचर्य हा केवळ देहाचा अलंकार नाही ती मनाची उत्तुंगता आहे हे उत्तुंगपण आपण अजुन मिळवू शकलो नाही असा संशय असल्याने स्वतः ची परीक्षा घेण्यासाठी गांधीजींनी अखेरच्या पर्वात सत्याचे प्रयोग करून पाहिले त्यासाठी त्यांनी आपली प्रतिमा पणाला लावली .आपली ही परीक्षा त्यांनी जगापासून लपविली नाही. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे सांगणाऱ्या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे. आपलं पूर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या सामान्य माणसा सारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्वा पर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच आणि आपणही असे काही असामान्य करू शकतो याची न कळत स्फूर्ती मिळते.

Comments

  1. सत्य हा या आत्मचरित्राचा गाभा आहे. महात्मा गांधी सारखा माणूस या पृथ्वीतलावर जन्माला येऊन गेला यावर कदाचित पुढील पिढी विश्वास ठेवणार नाही असे महान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले होते ते हे पुस्तक वाचल्यानंतर खरे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...