Skip to main content

क्रांति दिन - 9 ऑगस्ट

      मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आमच्या हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगांवच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सी. एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास ह्या विषयावर व्याख्यान दिले.आपल्याच परिसरात वाळवा तालुक्यात झालेले स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 
   वाळवा तालुका हा सांगली जिल्ह्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पुढारलेला तालुका आहे. वाळवा तालुका हा शुर, गुणी व स्वातंत्र्यप्रिय लोकांचा मुलुख म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचे जसे त्याचे नाव जसे पंचक्रोशीत दोन हात करण्यास दुमदुमत होते तसे स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या सर्व विधायक क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा प्रयत्नही विशेष उल्लेखनीय आहे हे स्पष्ट आहे.  1892 सली कशाळकर आणि मुंदले यांनी प्रतोद हे वर्तमानपत्र  सातारा आणि इस्लामपूर येथे सुरू होते. वाळवा तालुक्यातील लोक जागृत व राष्ट्रप्रेम आष्टा गोविंदराव उर्फ रावसाहेब लिमये हे वकील होते.राष्ट्रीय सभेसाठी वाळवा तालुक्यातील रावसाहेब लिमये व हरिभाऊ तळवलकर आघाडीवर होते.आचार्य जावडेकर यांनी 1921 ते 26 या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे व प्रचाराचे काम केले.26 जाने 1930 रोजी वाळवा तालुक्यातील लोक व सर्व कार्यकर्ते एकत्रित येवून कायदेभंग केला. 
अशा प्रकारे डॉ. सी.एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास यावर प्रकाशझोत टाकला.

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...