Skip to main content

डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती - 12 ऑगस्ट 23

               
                    आज 12 ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर रंगनाथन यांची जयंती.  ग्रंथालय हे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजनाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन! 
   ज्या काळात भारतात ग्रंथालयांना फारसे महत्व प्राप्त झालेले नव्हते त्याकाळात इंग्रजी विषयात पहिला वर्ग मिळवून त्यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी प्राध्यापक होण्यापेक्षा ग्रंथपाल होणे पसंद केले. त्याचे कारण म्हणजे ते स्वतः ग्रंथप्रेमी होते, ग्रंथालयां बद्दल त्यांच्या मनात आदर होता. ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञान प्रसाराचे कार्य करता येईल हा विश्वास त्यांना होता. एक मात्र खरे की त्यांचा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या  आणि ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने भाग्याचा ठरला. देशातील ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांना विनामूल्य खुली करण्याचा विचार  सर्वप्रथम त्यांनी रुजवला आणि नंतर तो जोपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. आदर्श ग्रंथालय कायदा मसुदा तयार केला, ग्रंथालयशास्त्र शिक्षण वर्ग सुरू केले, पदव्युत्तर आणि पी.एच. डी चा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले. ग्रंथालयशास्त्र शिक्षणाचा देशात प्रसार होण्यासाठी आणि या शिक्षणाला व्यावसायिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी डॉ. रंगनाथन यांनी प्रयत्न केल्यामुळेच ग्रंथालय व्यवसायाला देशात मनाचे स्थान मिळाले.भारताची कीर्ती जागतिक ग्रंथालय क्षेत्रात पसरवली, त्यांनी 50 हून अधिक ग्रंथ व 1500 हून अधिक लेख त्यांनी लिहिले. त्यांना अनेक मान सन्मान मिळाले ब्रिटिश सरकारने 1935 मध्ये ' रावसाहेब ' हा किताब दिला. दिल्ली विद्यापीठाने डी. लिट, 1957 साली पद्मश्री .असे अनेक मान सन्मान त्यांना मिळाले.
  सतीचे वाण घेवून डॉ. रंगनाथन यांनी आपले सारे आयुष्य ग्रंथालये व ग्रंथालयशास्त्र  यासाठी वेचले शेवटी त्यांनी 27 सप्टेंबर 1972 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ....

Comments

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...