Skip to main content

डॉ. अब्दुल कलाम जयंती - वाचन प्रेरणा दिन 15 आॅक्टो.2020


भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती १५ आॅक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्या मध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव यामुळेच त्यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तुत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महसत्ता येणार आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे.

तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्याकडे अदभुत साहस आहे हे पटवून देण्यासाठी  The Ignited Minsa , The  Luminous Spark, Wings of Fire  , 

पुस्तके लिहिली. तुमच्या मेंदूतील आणि चेतना मधील ठिणगीला ओळखले म्हणून त्यांनी प्रत्येकाकडे चेत नेची शक्ती आहे अगदी प्रत्येक मुलाकडे म्हणून त्यांनी You are Born to Blossom   पुस्तक लिहिले. डॉ. कलाम हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.2020 सालात प्रगत भारताचे सप्न त्यांनी सर्व भारतीयां समोर ठेवले व त्यामुळे देशात वैचारिक पातळीवर एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली . प्रगत भारताचे डॉ. कलाम यांचेस्वप्न पूर्ण करायचे असेल तर  विद्यार्थी सुसंस्कारित होणे गरजेचे आहे. वाचनामुळे मनावर संस्कार होतात, विचारांना चालना मिळते, काय चांगले काय वाईट यातील फरक कळतो. आणि म्हणूनच विद्यार्थ्याना वाचनास प्रवृत्त करण्यासाठी डॉ. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.

काळानुसार वाचनाची माध्यमे बदलली असली तरी वाचनाचे महत्व कमी झालेले नाही. शरीराचा जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी वाचन महत्वाचे असते. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. वाचाल तर वाचाल ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. परन्तु आजच्या तरुण पिढीला वाचनाचे वेड असायला हवे तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुध्दीची मशागत होते. माणसाचे व्यक्तिमत्त्व विकास वाचनामुळे होतो. डॉ. कलाम नेहमीच म्हणत "  पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंद मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे." युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती. वाचाल तर वाचाल असे आपण नेहमीच म्हणतो पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होवो हीच त्यांना आदरांजली.!


Comments

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...