Skip to main content

राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती - 26 जुन 2020

आज दि. 26 जुन रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती. शाहू महाराजांचा हा जन्म दिवस ' सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
कार्य - 
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ई. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. ई. स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वदोक्त प्रकरण शाहू महाराजांचा काळात झाला.
राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, मूकनायक वृत्तपत्रसाठी सहकार्य केले. तसेच चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देवून प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ' राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था, व्यापार पेठ , राधानगरी धरण उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उभारणी करून देवून कृषिविकास कडे लक्ष पुरवले. त्यांना लोकांविषयी कणव होती. त्यांनी हजेरी पद्धत बंद केली. जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी रखवालदार नेमले. वणवण फिरणाऱ्या लोकांना राहण्याची सोय झाली व त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येवू लागले.राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला, कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
शाहू महाराजां वरील विविध प्रकाशित साहित्य:
१)Rajarshi Shahu Chhatrapati: A Socially revolutionary King 
२)शाहू महाराजांची चरित्रे- माधवराव बागल 
३) बी. ए. लठ्ठे यांनी लिहिलेले इंग्रजीतील पहिले चरित्र राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य -  रा. ना. चव्हाण
५) राजर्षी शाहू छत्रपती- डॉ. रमेश जाधव
६) कोल्हापूरचे शाहू छत्रपती चरित्र व कार्य -एकनाथ घोरपडे
७) राजर्षी शाहू कार्य व काळ- रा. ना. चव्हाण
८) समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- डॉ. सुवर्णा नाईक
९) शाहू - कादंबरी- श्रीराम पचींद्रे

Comments

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...