Skip to main content

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील एका लहानशा खेड्यात व अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले त्यांनी आपल्या कर्तृतने महाराष्ट्राच्या व भारताच्या शासनामध्ये अनेक उच्चपदस्थ स्थान भूषविली.. महाराष्ट्र राज्याचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री भूषविली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६  पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणार कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८४ रोजी तर दुसरी आवृत्ती यशवंतराव चव्हाण यांच्या जनमशताब्दी वर्षानिमित्त रोहन प्रकाशन ने प्रकाशित केली.
देवराश्ट्रे हे त्यांचे जन्मगाव ते सातारा जिल्ह्याच्या एका टोकाशी वसलेले आहे.त्या गावच्या रम्य आठवणी पासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. सार्वजनिक आयुष्यात यशवंतराव चव्हाण कसे घडत गेले याची देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधी पर्यंतची कहाणी आहे. यशवंत राव ४ वर्षाचे असताना त्यांचे वडील प्लेगने वारले. पुढील जबाबदारी आईने पेलली. याग्रंथात यशवंतराव आपल्या आईबद्दल म्हणतात" माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण ती शिक्षणाचे मोल मनोमन जाणंत होती. आमच्या घरची परिस्थिती गरिबीची असली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. जडण घडण या पहिल्या प्रकरणात शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला तुला मोठे झाल्यावर काय व्हावेसे वाटते हे लिहायला सांगितले तेव्हा यशवंतराव मी यशवंतराव चव्हाण होणार असे लिहतात या प्रसंगातून त्यांच्यात प्रचंड जिद्द, आत्मविशवास दिसून येतो.
या पुस्तकात त्यांनी आपल्या जन्मतारखे बद्दल तपशील काहीसा गमतीशीर आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात माझा जन्म देवराष्ट्रे येथे १२ मार्च १९१३ रोजी झाला . शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे अपत्य असल्याने माझा जन्म तारखेची नोंद ठेवण्याची काळजी घेतली नाही. काही मंडळी तुमची निश्चित जन्म तारीख सांगा म्हणतात तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो व हीच तारीख जन्मदिवस म्हणून पाळतो आहे.
यशवंतराव चव्हाण हे कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये असताना त्यांना वाचनाची गोडी अधिक वाढली तसेच सामाजिक कार्याबद्दल असलेली समज अधिक वाढली. भारताच्या स्वातंत्र्यवसांग्रमामध्ये अनेक घडामोडी घडत असताना ते त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी होते तो काळ लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधी यांच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. १९२९ सालच्या अखेरीस ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होवू लागले. यशवंतराव यांचा ओढा महात्मा गांधी व नेहरू यांच्या विचारसरणीकडे होता. कराड व सातारा जिल्ह्यातील राजकीय घडमोडीं व सभांच्या बातम्या पाठविण्याचे काम ते करीत. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या चार वर्षे त्यांची  राजकीय आकलन वाढवण्यासाठी उपयोगी ठरली. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांची ओळख सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून झाली. निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणे हाताळायची ह्याचे त्यांना उत्तम भान याच काळात आले. १९३३ मध्ये कारावास घडला १९४६ मध्ये मार्च महिन्यात मुंबई विधिमंडळ झालेल्या निवणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून आले व त्यांची नेमणूक पार्लमेंट सेक्रेटरी झाले.
कृष्णाकाठ मध्ये यशवतरावांनी बाळासाहेब देसाई, बाळासाहेब खेर, वडील, आई विठाई, वडीलबंधू तसेच पत्नी वेणुताई यांच्या बद्दल आत्मीयतेने लिहलेले दिसून येते.  यशवंतरावांची विलक्षण प्रतिभा व भाषेवरील प्रभुत्व या आत्मकथनमध्ये दिसून येते .परिस्थितीचे भांडवल न करता निष्ठेने कार्यावर श्रद्धा ठेवून जिद्द, चिकाटीने प्रयत्न केले तर सामान्य माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. यशवंतराव म्हणतात " व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत परिस्थिती, काल, व्यक्ती, समाज व त्याचबरोबर ग्रंथ देखील तेवढीच महत्वाची भूमिका बजावतात"


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...