Skip to main content

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील एका लहानशा खेड्यात व अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले त्यांनी आपल्या कर्तृतने महाराष्ट्राच्या व भारताच्या शासनामध्ये अनेक उच्चपदस्थ स्थान भूषविली.. महाराष्ट्र राज्याचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री भूषविली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६  पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणार कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८४ रोजी तर दुसरी आवृत्ती यशवंतराव चव्हाण यांच्या जनमशताब्दी वर्षानिमित्त रोहन प्रकाशन ने प्रकाशित केली.
देवराश्ट्रे हे त्यांचे जन्मगाव ते सातारा जिल्ह्याच्या एका टोकाशी वसलेले आहे.त्या गावच्या रम्य आठवणी पासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. सार्वजनिक आयुष्यात यशवंतराव चव्हाण कसे घडत गेले याची देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधी पर्यंतची कहाणी आहे. यशवंत राव ४ वर्षाचे असताना त्यांचे वडील प्लेगने वारले. पुढील जबाबदारी आईने पेलली. याग्रंथात यशवंतराव आपल्या आईबद्दल म्हणतात" माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण ती शिक्षणाचे मोल मनोमन जाणंत होती. आमच्या घरची परिस्थिती गरिबीची असली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. जडण घडण या पहिल्या प्रकरणात शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला तुला मोठे झाल्यावर काय व्हावेसे वाटते हे लिहायला सांगितले तेव्हा यशवंतराव मी यशवंतराव चव्हाण होणार असे लिहतात या प्रसंगातून त्यांच्यात प्रचंड जिद्द, आत्मविशवास दिसून येतो.
या पुस्तकात त्यांनी आपल्या जन्मतारखे बद्दल तपशील काहीसा गमतीशीर आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात माझा जन्म देवराष्ट्रे येथे १२ मार्च १९१३ रोजी झाला . शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे अपत्य असल्याने माझा जन्म तारखेची नोंद ठेवण्याची काळजी घेतली नाही. काही मंडळी तुमची निश्चित जन्म तारीख सांगा म्हणतात तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो व हीच तारीख जन्मदिवस म्हणून पाळतो आहे.
यशवंतराव चव्हाण हे कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये असताना त्यांना वाचनाची गोडी अधिक वाढली तसेच सामाजिक कार्याबद्दल असलेली समज अधिक वाढली. भारताच्या स्वातंत्र्यवसांग्रमामध्ये अनेक घडामोडी घडत असताना ते त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी होते तो काळ लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधी यांच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. १९२९ सालच्या अखेरीस ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होवू लागले. यशवंतराव यांचा ओढा महात्मा गांधी व नेहरू यांच्या विचारसरणीकडे होता. कराड व सातारा जिल्ह्यातील राजकीय घडमोडीं व सभांच्या बातम्या पाठविण्याचे काम ते करीत. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या चार वर्षे त्यांची  राजकीय आकलन वाढवण्यासाठी उपयोगी ठरली. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांची ओळख सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून झाली. निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणे हाताळायची ह्याचे त्यांना उत्तम भान याच काळात आले. १९३३ मध्ये कारावास घडला १९४६ मध्ये मार्च महिन्यात मुंबई विधिमंडळ झालेल्या निवणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून आले व त्यांची नेमणूक पार्लमेंट सेक्रेटरी झाले.
कृष्णाकाठ मध्ये यशवतरावांनी बाळासाहेब देसाई, बाळासाहेब खेर, वडील, आई विठाई, वडीलबंधू तसेच पत्नी वेणुताई यांच्या बद्दल आत्मीयतेने लिहलेले दिसून येते.  यशवंतरावांची विलक्षण प्रतिभा व भाषेवरील प्रभुत्व या आत्मकथनमध्ये दिसून येते .परिस्थितीचे भांडवल न करता निष्ठेने कार्यावर श्रद्धा ठेवून जिद्द, चिकाटीने प्रयत्न केले तर सामान्य माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. यशवंतराव म्हणतात " व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत परिस्थिती, काल, व्यक्ती, समाज व त्याचबरोबर ग्रंथ देखील तेवढीच महत्वाची भूमिका बजावतात"


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकप्रेमा बद्दल .....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले. राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते. त्यांच्या  या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके  होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास  घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून  त्यांना विनम्र अभिवादन! संदर्भ.... https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-...